सिंधुदुर्ग: शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी आमदार नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांसाठी अटकेपासून संरक्षण

0
68
सिंधुदुर्गात सुरू होणार मत्स्य महाविद्यालय, आमदार नितेश राणे

सिंधुदुर्ग :कणकवली येथील शिवसैनिक संतोष परब हल्ल्याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण येऊन आमदार नितेश राणे यांनी नियमित जामीन अर्ज दाखल करावा, असे निर्देश देऊन या प्रकरणात व्यक्तिगत स्वातंत्र्याचे परस्परविरोधी दावे आणि योग्य तपास यात समतोल साधला जावा,असे मत सर्वोच्च सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश ए.व्ही. रमणा यांनी व्यक्त केले. या प्रकरणी आमदार नितेश राणे यांना सर्वोच्च न्यायालयाने दहा दिवसांसाठी अटकेपासून संरक्षण दिले आहे. दहा दिवसांच्या आत सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयात शरण येऊन नंतर नियमित जामिनासाठी अर्ज करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.त्यामुळे नितेश राणे यांची अटक अटळ असल्याचे मानले जात आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या काळात १८ डिसेंबर रोजी कणकवली येथे परब यांच्यावर हल्ला झाला होता. परब हे जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे निकटवर्तीय असून करंजे गावचे माजी सरपंच आहेत. त्यांच्यावर इनोव्हा कारमधून आलेल्या दोघांनी धारदार चाकूने वार केले होते. या हल्ल्यात परब जखमी झाले होते. या प्रकरणाला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील राजकिय शत्रुत्वाची पार्श्वभूमी असल्याच्या संशयावरून पोलिसांनी भाजपच्या गोटात चौकशीची सूत्रे हलवली आहेत. मुख्य संशयित आरोपी सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग ग्रामीण पोलिसांनी दिल्लीतून अटक करण्यात यश मिळवले आहे. या हल्ल्यामागे नितेश राणे यांचा हात असल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला होता.

याप्रकरणी सिंधुदुर्ग जिल्हा न्यायालयाने अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळल्यानंतर राणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात त्याला आव्हान दिले होते. तिथेही राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यामुळे त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. दरम्यान, नितेश राणे कणकवली पोलिस ठाण्यात तीन वेळा चौकशीस सामोरे गेले होते. पोलिस तपासात आवश्यक ते सहकार्य करण्यास तयार असल्याचे त्यांनी या वेळी सांगितले होते.आमदार नितेश राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज सुप्रीम कोर्टातही फेटाळल्याचे वृत्त कळताच केंद्रीय मंत्री नारायण राणे दिल्लीहून कोकणकडे रवाना झाल्याचे वृत्त हाती आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here