संजय भाईप (सावंतवाडी)
शेर्ले जंगलामध्ये चोरटा दगडी कोळसा दडवुन ठेवल्याने खळबळ उडाली आहे. गोवा-महाराष्ट्रच्या सिमेवर कास शेर्ले हे गाव असल्याने या भागातुन तस्कर मोठ्याप्रमाणात चोरटी वहातुक करतात. आरोसबाग पुल बनवण्यासाठी आरोसबाग वासियानी गेली 50 वर्षे अथक परिश्रम घेतले त्याच्या परिश्रमला यश मीळाल्याने आज हा पुल झाला आहे. मात्र तस्कर या पुलाचा गैर वापर करत आहेत. या मार्गाने गोवा बनावटीच्या चोरट्या दारूची मोठ्या प्रमाणात वहातूक करत असताना शेर्ले जंगलामध्ये मोठ्याप्रमाणात चोरटा दगडी कोळसा ठेवल्याने खळबळ उडाली आहे.
हा दगडी कोळसा नेमका ठेवला कोणी? कशासाठी ठेवण्यात आला आहे? असे अनेक प्रश्न ग्रामस्थाना पडले असल्याने दबक्या आवाजात चर्चा करत आहेत मात्र भीतीपोटी याची खबर कोण पोलीसाना देण्यास धजत नाही.याची पोलिसांनी चौकशी करण्याची अपेक्षा करत आहेत.


