परमबीर सिंग यांनी मुंबईतील अँटेलिया प्रकरनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटी वसुलीचा आरोप लावला होता.त्यानंतर कालांतराने सिंगवर देखील भ्रष्टाचाराचे आरोप लावण्यात आले होते. त्यानंतर परमबीर सिंग मे महिन्यापासून सुट्टीवर गेले असून, ते अद्यापर्यंत परतलेले नाही.ते कुठे गेले याची कल्पना त्यांच्या घरच्यांना देखील नसल्याची माहिती मिळत आहे.
त्यांना अनेकदा चौकशीसाठी बोलवण्यात आले मात्र ते हजर राहू शकलेले नाही. त्यामुळे गुन्हे शाखेने न्यायालयात अर्ज दाखल केले होते. त्याला न्यायालयाने मंजुरी देत, परमबीर सिंग यांना फरार घोषित केले आहे. तसेच 30 दिवसांच्या आत हजर राहण्याचा अल्टीमेटम देखील दिला आहे.


