मुख्यंमंत्री उद्धव ठाकरे एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी आवाहन केले.’ माझी आपणास हात जोडून विनंती आहे, कृपया राज्यातील गोरगरीब आणि सर्वसामान्य प्रवाशांना वेठीस धरणारे आंदोलन करू नका. राज्याच्या परिस्थितीतबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले आपण सर्व अजूनही कोरोनाशी लढतोय. दोन वर्षांपासून या विषाणूचा मुकाबला करत आपण कसाबसा मार्ग काढतोय. त्यामुळे कृपया शासनाच्या प्रयत्नांना सहकार्य करा’ असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्यासाठी कळकळीची विनंती केली आहे.
एसटी कर्मचाऱ्यांनो तुम्ही आमचेच आहात, बाहेरचे नाहीत. तुम्हाला दिलासा द्यावा यासाठी, राज्य शासन मनापासून प्रयत्न करत आहोत. उच्च न्यायालयासमोर देखील शासनानं आपला प्रश्न सोडविण्यासाठी काय-काय पाऊलं उचलत आहोत ते सांगितलंय. न्यायालयाच्या सूचनेप्रमाणे तोडगा काढण्यासाठी आपण विशेष समिती नेमून कामही सुरु केलं आहे.
एसटी महामंडळाचे राज्य शासनामध्ये विलीनीकरण करावे यासाठी मागील तीन दिवसांपासून एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरू आहे.हायकोर्टाने दिलेले आदेश कर्मचाऱ्यांचे हित बघून दिले आहेत. त्यांची विलिनीकरणाची मागणी मोठी आहे. त्यासाठी समिती नेमली आहे. संप सुरू राहिल्यास एसटी कर्मचाऱ्यांची अडचण वाढेल, असं परिवहनमंत्री अनिल परब म्हटले आहे.संपप्रकरणी भडकवणाऱ्यांच्या भूलथापांना बळी पडू नका असं आवाहन त्यांनी एसटी कर्मचाऱ्यांना केले आहे. एसटी संपाच्या पार्श्वभूमीवर आंदोलनासाठी मंत्रालयाकडे जाताना भाजप नेते गोपीचंद पडळकर, किरीट सोमय्या यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही झाले तरी आम्ही मंत्रालयावर आंदोलन करणार असा इशारा सोमय्या यांनी दिला आहे.


