सिंधुदुर्ग : माणूसकीचा जागर करण्याची गरज- ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे

0
46
ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी वेंगुर्ला येथे मुक्त संवाद साधला.

वेंगुर्ला प्रतिनिधी – गेल्या आठ ते नऊ वर्षात भयानक स्वप्न दाखविणा-या माणसांच्या पाठीमागे आपण आहोत. सामाजिक सूत्र विसरत चाललो आहोत. साने गुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म‘ या गीतापासून ढळलेलो आहोत. माणूस समुह म्हणून आपण एकांगी पडत चाललो आहोत. तेव्हा आता माणूसकीचा जागर करण्याची गरज आहे आणि त्यासाठी कृती कार्यक्रम आवश्यक आहे असे मत ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी वेंगुर्ला येथे व्यक्त केले.

 बॅ.नाथ पै जन्मशताब्दी वर्षानिमित्त वेंगुर्ला नगरवाचनालय व बॅ.नाथ पै सेवांगण, मालवण यांच्या संयुक्त विद्यमाने वर्तमान राजकीय, सामाजिक आणि साहित्य-संस्कृती विषयी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांच्याशी मुक्त संवाद साधण्यात आला. हा कार्यक्रम सोमवारी सायंकाळी वेंगुर्ला नगरवाचनालयात पार पडला. पुढे बोलताना पठारे म्हणाले की, बिलकीस बानू खटल्यातील बलात्कार आणि खून करणा-या गुन्हेगारांना न्यायालयाने दिलेली शिक्षा पूर्ण होण्याआधीच सोडल्यानंतर त्या गुन्हेगारांचे स्वागत हे आरती ओवाळून, सत्कार करुन, मिठाई वाटून, करण्यात आले. माणसे एवढी संवेदनाशुन्य कशी होऊ शकतात. समाजातील या विकृती असलेल्या गुन्ह्याचे उदात्तीकरण कसे करु शकतात, या गुन्ह्याचे कौतुक? समाज म्हणून आपण कुठल्या गुंगीत अजून रहाणार आहोत, असा सवालही त्यांनी यावेळी केला.

  कार्यक्रमाची सुरुवात बॅ.नाथ पै यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन आणि साने गुरुजींच्या ‘खरा तो एकचि धर्म‘ या गीताने करण्यात आली. त्यानंतर ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांचा वेंगुर्ला नगरवाचनालयाचे कार्याध्यक्ष अनिल सौदागर यांच्या हस्ते, कथा-कादंबरीकार डॉ.महेश केळुसकर यांचा मंगल परुळेकर यांच्या हस्ते, लेखिका आणि पत्रकार संध्या नरे-पवार यांचा बॅ.नाथ पै सेवांगण मालवणचे कार्याध्यक्ष दीपक भोगटे यांच्या हस्ते, साहित्यिक आणि ‘शब्दालय‘च्या प्रकाशक सुमती लांडे यांचा सदानंद बांदेकर यांच्या हस्ते, अॅड.देवदत्त परुळेकर यांचा माया परब यांच्या तर दीपक भोगटेयांचा राजेश शिरसाट यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन तसेच बॅ.नाथ पै यांचे सहकारी जयप्रकाश चमणकर, सुधाकर तांडेल यांना या कार्यक्रमात तर पंढरीनाथ उर्फ आना महाले यांचा त्यांच्या निवासस्थानी जाऊन सत्कार करण्यात आला. 

 यापुढे संवाद साधताना रंगनाथ पठारे म्हणाले की, बॅ.नाथ पैंचा विश्वास लोकशाहीवर होता. चर्चेने प्रश्न सुटतात यावर असे त्यांचे ठाम मत होते. सामाजिक, राजकीय कितीही उलथापालथ झाली तरी ही लोकशाहीच अशा संवेदनाशुन्य घटनांना ठिकाणावर आणत आली आहे. साहित्यिकांनी बॅ.नाथ पैंनी सांगितल्याप्रमाणे हस्थिदंती मनो-यात न रहाता, स्वप्नाळू दुनियेत न रमता जे सत्य आहे ते प्रखरतेने मांडता आले पाहिजे आणि त्यादृष्टीने समाज मनाचा आरसा म्हणून काम करताना संवेदनशिलता कशी वाढीला लागेल यासाठीही काम केले पाहिजे, असे सांगितले.  

      या कार्यक्रमाला जयप्रकाश चमणकरसाहित्यिक प्रविण बांदेकरडॉ.संजिव लिगवतडॉ.राजेश्वर उबाळेअॅड.संदिप निबाळकर, डॉ.शरयू आसोलकरडॉ.श्रीकांत सावंतहरिहर वाटवेलक्ष्मीकांत खोबरेकरअनुजा तेंडोलकरसुधाकर तांडेल यांच्यासह जिल्ह्यातील ज्येष्ठ व नवोदित साहित्यिकसाहित्य प्रेमीविद्यार्थी उपस्थित होते.

      यावेळी संवादक डॉ.महेश केळुसकरसंध्या नरे-पवारसुमती लांडे व अॅड.देवदत्त परुळेकर यांनी ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांना विविध प्रश्न विचारीत मुलाखतीद्वारे आजच्या समाजातील आस्थेचे प्रश्न‘ असलेल्या सामाजिकराजकीयसांस्कृतिक आदी विषयांवर विस्तृत चर्चा केली.

      कार्यक्रमाचे सूत्रसंचालन साप्ताहिक किरातच्या संपादक सीमा मराठे यांनीप्रास्ताविक अॅड.देवदत्त परुळेकर यांनी तर आभार प्रा.महेश बोवलेकर यांनी मानले.

फोटोओळी – ज्येष्ठ साहित्यिक रंगनाथ पठारे यांनी वेंगुर्ला येथे मुक्त संवाद साधला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here