झी मराठीवर लवकरच ‘हे तर काहीच नाय!’ नवीन कार्यक्रम प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.यामध्ये सामान्य लोकांना सेलिब्रिटींच्या आयुष्य म्हणजे अगदी सुंदर आणि चकचकीत दिसत असत.पण यामागे आणखीन कितीतरी गोष्टी असा अस्ततत ज्या आपल्याला माहीतच नसतात. सेलिब्रिटींच्या आयुष्यातील अशाच काही रंजक गोष्टी सांगणारा हा कार्यक्रम झी मराठीवर रंगणार आहे.
या कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून सिद्धार्थ जाधव आणि सैराट फेम तानाजी गलगुंडे असणार आहे. त्याचसोबत ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम पाठकबाई अर्थात अक्षया देवधर प्रथमच सूत्रसंचालकाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळेल.अगदी शाहरुखपासून शरद केळकरपर्यंत, सुनील गावस्करपासून सुनील बर्वेपर्यंत सेलिब्रिटींच्या आयुष्यातील रंजक गोष्टी, कष्ट,त्याशिवाय त्यांचे छंद यासारख्या गोष्टी त्या कलाकारांच्याच टॉनिन प्रत्यक्ष आपल्याला पहायला मिळणार आहेत.