12 वी व 10 वी च्या लेखी परीक्षेस उशिरा येणाऱ्या परीक्षार्थ्यींना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही- डॉ अशोक भोसले सचिव, राज्य मंडळ

0
163

पुणे: सध्या 12 वी व 10 वी च्या बोर्डाच्या परीक्षा सुरु आहेत.या लेखी परीक्षेस अपवादात्मक परिस्थितीमध्ये 10 मिनिटे उशिरा प्रविष्ठ होणाऱ्या परीक्षार्थींना आतापर्यंत परीक्षा देण्यासाठी उशीर झाला तरी प्रवेश देण्यात येत होता. पण या सवलतीचा लाभ घेऊन परीक्षेमध्ये गैरप्रकार होत असल्याचे निदर्शनास आल्याने दि. 16 मार्च 2022 रोजी पासून उशिरा येणाऱ्या परीक्षार्थ्यींना परीक्षा केंद्रावर प्रवेश दिला जाणार नाही. असे डॉ अशोक भोसले सचिव, राज्य मंडळ पुणे हे कळवितात.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेण्यात येणारी उच्च माध्यमिक प्रमाणपत्र इ.12 वी ची लेखी परीक्षा दि. 4 मार्च 2022 व 7 एप्रिल व माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र इ.10 वी ची लेखी परीक्षा दि. 15 मार्च 2022 ते दि4 एप्रिल 2022 या कालावधीत आयोजित करण्यात आली आहे.लेखी परीक्षेसाठी विहीत वेळेपेक्षा सकाळच्या सत्रात 10.30 वाजता व दुपारच्या सत्रात 3 वाजता उशिराने येणाऱ्या विद्यार्थ्यांबाबत पुढीलप्रमाणे कार्यपध्दती होती. उत्तरप्रत्रिका लेखन प्रत्यक्ष सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना परीक्षागृहात प्रवेश देण्याची सुविधा उपलब्ध नाही. मात्र अपवादात्मक परिस्थितीत या वेळेनंतर 10 मिनिटे उशीरा येणाऱ्या परीक्षार्थ्यांना विलंबाच्या कारणाची खातरजमा करुन केद्रसंचालक स्तरावर परवानगी देण्यात येत होती. 10 मिनीटांनतर अतिशय अपवादात्मक परिस्थितीत विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ठ होण्यास केंद्रावरआल्याचे त्यामागचे कारण केंद्रसंचालकाना रास्त वाटल्यास त्यांनी विभागीय अध्यक्ष, विभागीय सचिव, याना दुरध्वनीवरुन पूर्वमान्यता घेवून आणखी 10 मिनिटे (एकुण 20मिनिटांचा) विलंब क्षमापित करुन परीक्षार्थ्यांला परीक्षेस प्रविष्ठ करुन घेता येईल अशा सूचना राज्य मंडळाकडून देण्यात आलेल्या आहेत.

या सवलतीचा लाभ घेवून लेखी परीक्षेस उशिरा प्रविष्ठ होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मोबाईलमध्ये गैरमार्गाने प्रसारित झालेला प्रश्नपत्रिकातील आशय असल्याचे निदर्शनास आले आहे. ही बाब अतिशय गंभीर असल्याने अशा प्रकरणांमध्ये संबंधिताविरुध्द गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गैरप्रकारांना प्रतिबंध करण्यासाठी लेखी परीक्षा उशिराने प्रविष्ठ होवू देण्याची सवलत आज दि. 16 मार्च 2022 पासून बंद करण्यात येत आहे. या बाबत खालीलप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना देण्यात आलेल्या आहे. सर्व संबंधित विद्यार्थ्यांनी परीक्षा सुरु होण्यापूर्वी किमान एक तास अगोदर परीक्षा केंद्रावर हजर राहणे आवश्यक आहे.

विद्यार्थ्यांना परीक्षा सुरु होण्यापूर्वी 10 मिनिटे अगोदर (प्रश्नपत्रिका वाटप करण्याच्या वेळेपर्यंत) म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये सकाळी 10.20 पर्यंत आणि दुपारच्या सत्रामध्ये 2.50 पर्यंत परीक्षा कक्षामध्ये हजर राहणे बंधनकारक राहील.विद्यार्थी अपरिहार्य कारणामुळे परीक्षा केंद्रावर परीक्षा सुरु होतेवेळी म्हणजेच सकाळच्या सत्रामध्ये 10.30 वा . व दुपारच्या सत्रामध्ये दुपारी.3. वा पर्यंत आल्यास त्याचे शैक्षणिक नुकसान होवू नये यासाठी त्यांची तपासणी करुन विद्यार्थ्यांस विभागीय मंडळाच्य मानयतेने परीक्षा बसण्यास परवानगी देण्यात यावी. परीक्षा सुरु झाल्यासनंतर सकाळच्या सत्रामध्ये सकाळी.10.30 नंतर व दुपारच्या सत्रामध्ये 3 नंतर कोणत्याही परिस्थितीत विद्यार्थ्यांना परीक्षा कक्षामध्ये प्रवेश देण्यात येवू नये. सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी जास्तीत जास्त दक्षता पथके कार्यान्वीत करुन परीक्षा केंद्र उपकेंद्रांना वारंवार भेटी देवून परीक्षा काळात होणाऱ्या गैरप्रकारास प्रतिबंध करण्यासाठी शासन स्तरावरुन सूचना देण्यात आले आहेत. परीक्षा केंद्रात मोबाईल व अन्य तत्सम साधने बाळगण्यास व वापरण्यास प्रतिबंध करण्यात आले आहे. याची परीक्षार्थी व सर्व संबंधित घटकांनी पुन:श्च नोंद घ्यावी. अशी माहिती पुणे राज्य मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी दिली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here