94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीला अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ

0
76

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ग्रंथ दिंडीला अभूतपूर्व नाशिकमध्ये उत्साहात प्रारंभ झाला. टाळ-मृदूंगाच्या गजरात, लेझीमच्या तालावर ग्रंथ दिंडीला अभूतपूर्व उत्साहात प्रारंभ झाला.जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिंडीच्या अग्रभागी हातात विणा घेऊन वारकर्‍याची भूमिका पार पाडली.

94 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे आज भुजबळ नाॅलेज सिटीत सजलेल्या कुसुमाग्रजनगरीत दिमाखात उद्घाटन होणार आहे. सायंकाळी साडेचार वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संमेलनाचे अध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर, मावळते अध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो, प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर आणि विश्वास पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत हा समारंभ होणार आहे.

मी लेखक नाही मात्र वाचक जरूर आहे. लेखकाला लेखन स्वातंत्र्य असलेच पाहिजे या मताचा मी आहे. त्याच्यावर कुणी निर्बंध लादणार असेल तर त्याला पहिला विरोध करणारा मी असेन. लोकहितवादी मंडळ आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुसुमाग्रज नगरी मेट भुजबळ नॉलेज सिटी नाशिक येथे उद्घाटन कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.

यावेळी मराठी भाषा विभागाचे मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादाजी भुसे, प्रमुख पाहुणे जावेद अख्तर, अखिल भारतीय मराठी साहित्य मंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील,उदघाटक विश्वास पाटील, डॉ.दादा गोऱ्हे,रामचंद्र साळुंखे, खासदार श्रीनिवास पाटील, शुभांगीणी राजे गायकवाड, ज्येष्ठ साहित्यिक नागनाथ कोत्तापल्ले, सदानंद मोरे, उत्तम कांबळे, लक्ष्मीकांत देशमुख, श्रीपाल सबनीस, हेमंत टकले, समीर भुजबळ, पंकज भुजबळ, जयप्रकाश जातेगावकर, विश्वास ठाकूर, प्रा.डॉ.शंकर बोऱ्हाडे, सुभाष पाटील, मिलिंद कुलकर्णी,प्राचार्य प्रशांत पाटील,  संजय करंजकर, दिलीप साळवेकर, स्वानंद बेदरकर यांच्यासह पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलतांना पालकमंत्री तथा स्वागताध्यक्ष छगन भुजबळ म्हणाले, साहित्य संमेलनाच्या इतिहासात नाशिकचे नाव सुवर्णाक्षरात लिहिले जाईल अशी अजोड कामगिरी नाशिकने केली आहे. मुंबई येथे १९३८ मध्ये झालेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षस्थान स्वातंत्र्यवीर सावरकरांनी भूषविले होते आणि त्यांनी ‘लेखकांनी हातात लेखण्या न घेता बंदुका घ्या’ असा सल्ला तुम्हा मंडळींना दिला होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या चळवळीला अनुलक्षूण सावरकरांनी साहित्य मंचावरून आपले विचार मांडले हे लक्षात येते. पुढील काळात संमेलनाध्यक्षपदाचा मान तात्यासाहेब शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांना लाभला. मराठी भाषेतले दुसरे ज्ञानपीठ त्यांना मिळाले आहे, हे मी आपणास सांगितले पाहिजे असे नाही. तात्यासाहेबांनी मडगाव,गोवा येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षीय भाषणात मराठी भाषेची होणारी आबाळ सगळ्यांच्या लक्षात आणून दिली होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here