रत्नागिरी प्रतिनिधि:
काही वर्षा पासून एसटी स्टँड चे काम करण्यास घेतले गेले होते. सदर काम अजूनही अर्धवट परिस्थितीत ठेवले गेले आहे. त्यामुळे जनतेला रस्त्यावर उभे राहून एसटी ची उन्हापावसातून वाट पाहावी लागते. नाहक त्रास सहन करावा लागतो. पण सदर काम अर्धवट परिस्थितीत दिसले जाते.सदर काम का पूर्ण होत नाही ? कंत्राटदार कोण आहे ? कॉन्ट्रॅक्टरला किती पैसे अदा केले आहेत? अश्या विचारणा महिला काँग्रेस जिल्हाध्यक्ष ॲड अश्विनी आगाशे यांनी केला आहे.
तसेच तश्या आशयाचे निवेदन रत्नागिरी जिल्हा एसटी चे अधिकारी यांच्याकडे देण्यात आले आणि माहिती अधिकारात अर्ज सुद्धा केला आहे. सदर काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे अशी मागणी काँग्रेस तर्फे करण्यात आली. तदप्रसंगी महिला जिल्हाध्यक्ष ॲड अश्विनी आगाशे, सामाजिक न्याय विभाग प्रदेश अध्यक्ष अशोक जाधव, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष दिपक राऊत,जिल्हा सरचिटणीस हनीफ खालिपे, महिला प्रदेश सरचिटणीस रूपाली सावंत,महिला तालुकाध्यक्ष रिझवणा शेख आणि मिडिया प्रदेश सचिव सुस्मिता सुर्वे इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते. ं


