राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अमित सामंत: महायुतीचे सरकार मराठा आरक्षण दडपण्याचा प्रकार करत आहे..
कुडाळ -: जालना अंतरवाली सराटी येथे मराठा समाजामार्फत मराठा आरक्षणासाठी शांततेच्या मार्गाने पुकारलेल्या मराठा आक्रोश आणि मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री हे मराठा समाजाचेच असताना आंदोलकांवर महायुती सरकार पुरस्कृत केलेला अमानुष आणि निंदनीय लाठीचार्ज हल्ला लांच्छनास्पद आहे,या निंदनीय घटनेला जबाबदार असलेले महायुती सरकार आणि गृहमंत्री यांचा सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस जाहीर निषेध करत असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत यांनी दिली.https://sindhudurgsamachar.in/goa-गोव्यात-खून-झालेल्या-युव/