रत्नागिरी रेल्वे स्थानकात थकलेल्या प्रवाशांना मोफत पाणीवाटप
गणेशोत्सवासाठी गावी परतणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा
रत्नागिरी :
गणेशोत्सवासाठी विविध ठिकाणांहून रेल्वेने रत्नागिरीत दाखल होणाऱ्या प्रवाशांना दिलासा देण्यासाठी रत्नागिरी रेल्वे स्थानकावर मोफत पाणीवाटप करण्यात आले.
लांबचा रेल्वे प्रवास करून थकलेल्या प्रवाशांना स्थानकावर मोफत पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यात आले. गणेशोत्सवासाठी मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात परतत असताना प्रवाशांसाठी करण्यात आलेल्या या उपक्रमाचे स्वागत करण्यात आले.
गावी परतणाऱ्या प्रवाशांना प्रवासादरम्यान आवश्यक सुविधा मिळाव्यात आणि त्यांचा प्रवास अधिक सुखकर व्हावा, या उद्देशाने पाणीवाटप करण्यात आले.