रत्नागिरी- ( न्यूज नेटवर्क) : शहरात किरण सामंत यांना केव्हाही उमेदवारी जाहीर होणार अशा शक्यतेने राजकीय पक्षांमध्ये मोठे वादळ उठले आहे. अखेर शिंदेंनी डाव टाकला आणि किरण सामंत यांना उमेदवारी खेचून आणली, अशी चर्चा शहरात सुरु असून लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीतर्फे उद्योजक किरण सामंत यांना उमेदवारी मिळविण्यासाठी पालकमंत्री उदय सामंत यांनी केलेले प्रयत्न फळाला येणार आहेत, असे म्हटले जात आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-रामनवमी-उत्सवानिमित्त-श/
आमच्या प्रतिनिधींनी याबाबत उद्योजक किरण सामंत यांच्याकडे संपर्क साधला असून त्यांची प्रतिक्रिया काही मिनिटातच उपलब्ध होणार आहे. त्यांनी अद्याप जाहीर केलेले नाही पण नेमकी प्रतिक्रिया देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद आयोजित केल्याचे समजते.