Kokan: नवे शैक्षणिक धोरण राबविताना परिपूर्ण नियोजन आहे काय? – संस्था चालक इर्शाद शेख यांचा सवाल

1
124
Kokan: नवे शैक्षणिक धोरण राबविताना परिपूर्ण नियोजन आहे काय? - संस्था चालक इर्शाद शेख यांचा सवाल
Kokan: नवे शैक्षणिक धोरण राबविताना परिपूर्ण नियोजन आहे काय? - संस्था चालक इर्शाद शेख यांचा सवाल

वेंगुर्ला प्रतिनिधी-येत्या शैक्षणिक वर्षापासून शालेय शिक्षणमंत्र्यांनी नविन शैक्षणिक धोरण लागू करणार असल्याचे सांगितले आहे. परंतु, याची प्रत्यक्षात  अंमलबजावणी कशी करणार याबद्दल संस्था चालक, शिक्षक, पालक व विद्यार्थी यांच्या मनामध्ये निर्माण झालेला संभ्रम निर्माण झाला आहे. हा संभ्रम दूर करावा अन्यथा काहीतरी करुन दाखविण्याच्या नादात विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होईल या जबाबदार कोण? असा प्रश्न सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसचे अध्यक्ष व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक शिक्षण संस्था चालक इर्शाद शेख यांनी उपस्थित केला आहे.  https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-ब्रेन-डेव्हलपमेंट-परीक/

 नवे शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी आवश्यक ती पूर्व तयारी या दोन-तीन महिन्यांत पूर्ण होणार कायआर्टसकॉमर्ससायन्सऐवजी नववीपासूनच संबंधित शाखांचे विषय निवडून ते बारावीपर्यंत घ्यायचे आहेत. त्यादृष्टीने आवश्यक असलेली नवी पुस्तके छापून पूर्ण होणार का?, दहावी बोर्डपरीक्षेऐवजी नववी ते बारावी दरवर्षी दोन सेमिस्टरमध्ये परीक्षा होऊन ते माक्र्स बारावीच्या अंतिम परीक्षेतही मिळवले जाणार आहेत. या नववी ते बारावी वर्गांना शिकवणारे शिक्षक कोण असणार आहेतत्यांची नेमणूक नव्याने होणार की जुने शिक्षकच शिकवणारत्यांची शैक्षणिक पात्रता नवीन अभ्यासक्रम शिकवण्यासाठी योग्य असणार आहे काकिंवा नवीन शिक्षक भरती करायची असेल तर कधी करणार त्यांचा पगार स्केल इ. काय असणार आहेनव्या पॅटर्नला अनुसरून त्यांचे प्रशिक्षण होणार आहे काआणि ते कधी होणार आहे?

 नववी ते बारावी पर्यंतचे विषय पारंपरिकच असणार आहेत की त्यात कालनिहाय काही नवे विषय अंतर्भूत होणार आहेत?, आता दहावीपर्यंत माध्यमिक व अकरावी बारावी उच्चमाध्यमिक असा पॅटर्न संपुष्टात येणार असल्याने आधीच्या पॅटर्नप्रमाणे ज्या माध्यमिक शाळा फक्त दहावीपर्यंतच आहेत व जे उच्च माध्यमिकचे वर्ग सिनियर कॉलेजला जोडलेले आहेततिथे नवा पॅटर्न कसा राबवला जाणार आहे?, पूर्वमाध्यमिक (पाचवी ते आठवी) व माध्यमिक (नववी ते बारावी) वर्ग एकाच इमारतीत भरणार असतील तर वेगवेगळे विषय कसे शिकवणार ? वेळेचेवर्गखोल्यांचे नियोजन कसे राहीलसर्व शाळा या दृष्टीने सक्षम आहेत का?, माध्यमिक शाळा ज्या सध्या दहावी पर्यंत आहेत तेथेच पुढील अकरावी बारावी सुरू झाल्यास पदवी महाविद्यालयांना जोडून असणारी आताची ज्युनियर कॉलेजला अकरावी बारावीसाठी विद्यार्थी कुठून मिळणार आणि तेथे काम करणा-या शिक्षकांचे काय होणारया सर्व वर्गांसाठी विद्यार्थी संख्येचा निकष काय असणार आहे?, विद्यार्थपालकशिक्षक व संस्थाचालक यांना या संदर्भात विश्वासात घेतले गेले आहे कायअसे एक ना अनेक प्रश्न आहेत ज्यामुळे संभ्रमावस्था निर्माण झालेली आहे. त्यामुळे या प्रश्नांची उत्तरे शिक्षणमंत्र्यांनी द्यावीत असे इर्शाद शेख यांनी स्पष्ट केले आहे.

फोटो – इर्शाद शेख

1 COMMENT

  1. […] वेंगुर्ला प्रतिनिधी – सन २०२२-२३ च्या नैसर्गिक आपत्तीमुळे आंबा पिकाची नुकसानी झाली असून जिल्ह्यातील शेतकरी पूर्णपणे कर्जबाजारी झाला आहे व कोकणातील शेतक-यांवर प्रथमच उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे शासनाने सर्व परिस्थितीचा विचार करून विनाविलंब पंचनामे करून शेतक-यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी आंबा काजू उत्पादक बागायतदार संघ सिंधुदुर्गच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे लेखी निवेदनद्वारे करण्यात आली आहे. याबाबत वेंगुर्ला तहसीलदार कार्यालय येथे निवेदन सादर करण्यात आले आहे. http://sindhudurgsamachar.in/kokan-नवे-शैक्षणिक-धोरण-राबवित/ […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here