
रत्नागिरी– बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क कायद्यानुसार ६ ते १४ वयोगटातील प्रत्येक बालकास मोफत व सक्तीचे शिक्षण घेण्याचा हक्क प्राप्त झाला आहे. स्थलांतरित बालकांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. बहुसंख्य बालकेही परराज्यातील असल्यामुळे त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात परराज्यातील शाळाबाह्य १८ मुले स्थलांतरित सापडली आहेत. बालकांचा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा हक्क, अधिकार अधिनियमाच्या अनुषंगाने सर्व शालाबाह्य मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्यासाठी शिक्षण विभाग प्रयत्नशील आहे. https://sindhudurgsamachar.in/kokan-शिवसेना-रत्नागिरी-सिंधु/
कर्नाटकसह नेपाळचाही समावेश यावर्षी जुलै महिन्यात ३ ते १८ वयोगटातील बालकांचे सर्वेक्षण या कालावधीत करण्यात आले. यामध्ये कर्नाटक ५, झारखंड १, उत्तरप्रदेश ५, हिमाचल प्रदेश १, नेपाळ २ अशी १४ तर कोल्हापुरातून १ व जिल्ह्यांतर्गत ३ अशी एकूण १८ मुले या मोहिमेदरम्यान सापडली आहेत. या सर्व मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यात आले आहे.