सावंतवाडी/सुनिता भाईप , दि- २८:-
न्हावेली येथील शेतकरी उत्तम सयाजी न्हावेलकर यांच्या भात शेतीत गव्या रेड्यांनी हैदोस घालून मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे, त्यामुळे येथील शेतकरी चिंतेत सापडले आहेत…गव्या रेड्यांनी केलेल्या नुकसानाची बाब न्हावेलीतील उपसरपंच अक्षय पार्सेकर यांच्या कानावर पडताचं क्षणी त्यांनी थेट शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी केली व लगेच वन अधिकाऱ्यांना पाचारण करून नुकसान भरपाईची मागणी केली, वन अधिकाऱ्यांनी शेताची पाहणी करून लवकरात लवकर नुकसान भरपाई संबंधित शेतकऱ्यांना मिळवून देण्याचे आश्वासन दिले.. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-सुप्रीम-कोर्टाच्या-महत/