Life style: आपण रोज देवपूजा का करतो . मागील शास्त्रीय कारण काय? – –

0
156
देवपूजा


♦ दिनेश बाळकृष्ण सावंत.

देवाची जी पूजा केली जाते त्यात देवाला खुष करणे हा उद्देश असला तरी गंध, अक्षता, फुले, धुप, दिप, उदबत्ती याने पुजा करण्यामागे शास्त्र आहे. माणसाप्रमाणे देवांचा स्वभाव नसल्याने देवाला खुष करण्याचा प्रश्नच येत नाही. भक्ति मार्गातील सर्व साधन पद्धती भक्तांचे देवाबद्दल असणारे भाव निर्माण करतात. शास्त्रोक्त पूजा केल्याने आपली भाववृद्धी होऊन ईश्वराचे अस्तित्व जाणवते.
नित्य पूजेत वापरण्यात येणारे घटक, पूजेच्या दृष्टीने त्यांचे महत्व
स्नान..
सर्वप्रथम आपण देवपूजा करताना देवघर स्वच्छ पुसून घेतो. त्यामुळे देवघरातून सकारात्मक ऊर्जा मोठ्या प्रमाणात प्रक्षेपित होते. आपण पूजत अससलेल्या देवतांच्या मूर्तित पवित्र लहरी याव्यात, मूर्तिवर चढलेली रजतमांची अपवित्र लहरींची पुट काढून टाकण्यासाठी देवांना नित्य स्नान घालणे आवश्यक आहे.
गंध……( चंदन).
सर्व देवता गंधानुगामी असतात म्हणजे गंधाकडे आकर्षित होतात. देवतांच्या आपल्या पूजेतील मूर्तित आकर्षित होऊन रहावे यासाठी देवताना चंदन लावतात.
अक्षता..
न तुटलेले तांदुळ म्हणजे अक्षता. देवाना अक्षता वाहिल्यावर देवांची शक्ति त्या अक्षतांकडे आकर्षित होते. वाहिलेल्या अक्षतांमध्ये. त्या देवांची कंपने निर्माण होतात. गणेश मूर्ति, कलश, अथवा कोणत्याही देवतांची मुर्ति ठेवताना मूर्तिखाली तांदुळ ठेवतात. त्या तांदळात देवांची कंपन शक्ति येते हे तांदुळ नंतर रोजच्या तांदळात मिक्स करून भात खाल्ल्यास ती शक्ति आपल्यालाही मिळते.
फुले…..
विशिष्ठ रंगाकडे त्या त्या देवता आकर्षित होतात. ऊदा, गणपती लाल रंगाकडे, शंकर सफेद रंगाकडे, विष्णु पिवळा रंग इ.
कोमेजलेल्या फुलांचा रंग बदलतो म्हणुन कोमजलेली फुले देवाला वाहु. नये.
हळद कुंकू……..
कुंकु हळदीपासून बनवतात. हळद पृष्ठभागाखाली निर्माण होते म्हणून जमिनीवर वाढणार्या वनस्पतीपेक्षा हळदीत भूमि लहरी जास्त असतात.असे पृथ्वीतत्व असलेले हळद कुंकू वाहिल्याने मूर्तीतील दैवी लहरी जोरात प्रक्षेपित होतात. पृथ्वीवरील अनिष्ट शक्तिंचा त्रास होत नाही.पूर्वीच्या काळी स्त्रिया ठसठसशीत कुंकू लावत, पुरूषही टिळा लावूनच बाहेर पडत.
धूप….
धूप हे सुवासिक वायुरूप द्रव्य आहे. या सुगंधामुळे देवता पूजास्थळी आकर्षित होतात.. धूपाने घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. म्हणून सकाळ संध्याकाळ धूप ऊदबत्तीने पूजन.
दिप…….
खरी पूजा आत्मज्योतीनेच करायची असते. आपली साधना अल्प असल्याने ते आपल्याला जमत नाही म्हणून संकेत रुपाने निरांजनात गाईच्या तूपात वात पेटवून देवांना ओवाळतात. तुपाच्या दिव्यातुन निघणार्या लहरी सुक्ष्म असल्याने त्या अतिसुक्ष्म अशा देवतांच्या लहरी अकृष्ट करू शकतात. म्हणून वाढदिवसाला निरांजनाने ओवाळणे हा भाग महत्वाचा आहे.

आरती……..
आरती करताना घंटा व इतर वाद्ये वाजवतात. त्यामुळे मूर्तित आलेली देवतांची शक्ति बाहेर प्रक्षेपित व्हायला मदत होते. वाद्ये तालात वाजवावी. आरती सूरात म्हणावी. बेसूर वाद्ये वाजवणे व बेसूर आरती करणे म्हणजे वातावारणातील अनिष्ट शक्ति अकृष्ट करणे होय.

नमस्कार…
नमस्कार करतांना हाताचे तळवे एकमेकांना जोडले जातात. त्यामुळे एक विशिष्ट मुद्रा तयार होते. या मुद्रेमुळे आपण देवतांकडून येणार्या शक्ती, लहरी जास्त प्रमाणात ग्रहण करू. शकतो.
नैवेद्य प्रसाद………. प्रत्येक देवतेचा प्रसाद ठरलेला असतो. त्या त्या देवताना त्यांच्या आवडीचा निवेद्य दाखविल्याने त्या देवतांची शक्ति लहरी नैवेद्यातील प्रसादात येतात. असा प्रसाद खाल्ल्याने आपणासही ती शक्ति मिळते.
फार फार वर्षांपूर्वी आपल्या ऋषीमुनींनी देवासंदर्भात प्रत्येक कृती शास्त्रोक्त पद्धतीने ठरवून दिलेली आहे. फक्त स्वधर्माचा अभ्यास कमी असल्याने काही बुद्धीवादी त्यास अंधश्रद्धा म्हणतात. शेवटी कृती भावपूर्ण केल्याशिवाय अनुभूती येत नाही.
प्रदक्षिणा……
प्रदक्षिणा घातल्याने देवतांच्या अष्टबाजूने येणाऱ्या लहरी आपण ग्रहण करू शकतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here