Maharashtra: पहाटेपासून पंढरपुरात भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ; दर्शनासाठी लागतोय 20 ते 22 तासांचा वेळ

0
33

पंढरपूर– आज कार्तिकी अर्थात प्रबोधिनी एकादशी असून, आज देव चार महिन्यांच्या निद्रेतून जागे होतात. चार महिन्यापूर्वी म्हणजेच आषाढी अर्थात देवशयनी एकादशीला विठुराया निद्रिस्त असतात आणि चातुर्मास संपल्यावर आज कार्तिकी एकादशीला देव जागे होतात. https://sindhudurgsamachar.in/kokan-सिंधुदुर्ग-राजकोट-येथील/

त्यामुळे आजच्या एकादशीला विठुरायाचे दर्शन हे वारकरी संप्रदायासाठी अतिशय महत्वाचे मानले जाते. त्यामुळे पहाटेपासून पंढरपुरात भाविकांच्या संख्येत लक्षणीय वाढ होतांना पाहायला मिळत आहे. तर, कालपर्यंत भाविकांची संख्या कमी होती, पण पहाटेपासून हजारो भाविक दाखल झाल्याने पंढरपूर विठ्ठूनामाने दुमदुमून गेले आहे. विशेष म्हणजे, काल सकाळी 8 वाजेपासून दर्शन रांगेत उभे असलेल्या भाविकांना 24 तासानंतर दर्शन मिळाले आहे. तर, सध्या देवाच्या पायावरील दर्शनाला सरासरी 20 ते 22 तासांचा वेळ लागत असल्याचे चित्र आहे.

महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री विठ्ठल-रुक्मिणीची कार्तिकी एकादशीनिमित्त शासकीय महापूजा उपमुख्यमंत्री फडणवीस व अमृता फडणवीस यांच्या हस्ते आज पार पडली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here