Maharashtra: पोस्ट खात्यात नोकरीची संधी, 21000 नोकऱ्यांसाठी ना परीक्षा,ना मुलाखत,10 वी पास उमेदवार

0
76
post job,
पोस्ट खात्यात नोकरीची संधी, 21000 नोकऱ्यांसाठी ना परीक्षा,ना मुलाखत,10 वी पास उमेदवार

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचारन्यूज l मुंबई l 26 फेब्रुवारी

पोस्टामधील ही नोकर भरती परीक्षेशिवाय आणि मुलाखतीशिवाय होणार आहे. या सरकारी नोकरीसाठी तब्बल 21000 हून अधिक जागा रिक्त आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च आहे. दहावी उत्तीर्ण उमेदवार त्यासाठी अर्ज करू शकतात.https://sindhudurgsamachar.in/kokan-श्री-देवी-भराडी-आईचे-मा-आ/

इंडिया पोस्ट म्हणजेच भारतीय टपाल विभागाने ग्रामीण डाक सेवक (GDS) च्या एकूण 21413 पदांसाठी नोकर भरतीसाठी जागा जाहीर केल्या आहेत. यासाठी तुम्हाला कोणतीही लेखी परीक्षा किंवा मुलाखत द्यावी लागणार नाही तर या पदांसाठी निवड गुणवत्तेच्या आधारे होईल. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही भरती दहावी पाससाठी आहे. त्याची संपूर्ण माहिती indiapostgdsonline.gov.in वर तपासता येईल. तसेच येथून ऑनलाइन अर्ज देखील करता येईल. या पदांसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 मार्च आहे. त्यामुळे शेवटच्या तारखेची वाट

अर्ज शुल्क
ओबीसी उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये निश्चित केले आहे, तर एससी, एसटी, पीडब्ल्यूडी आणि महिला उमेदवारांसाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

वयोमर्यादा
भारतीय पोस्टने जीडीएस भरतीसाठी वयोमर्यादा देखील निश्चित केली आहे. याअंतर्गत अर्ज करण्यासाठी वय किमान 18 वर्षे आणि जास्तीत जास्त 40 वर्षे असावे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सूट मिळेल.

असा अर्ज करा
अधिकृत वेबसाइट – indiapostgdsonline.gov.in ला भेट द्या.

तुमची मूलभूत माहिती भरून नोंदणी करा.

दहावीची गुणपत्रिका, फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करा.

शेवटी अर्ज सबमिट करा आणि त्याची प्रिंटआउट घ्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here