Maharashtra: राज्यात आज मेघगर्जनेसह अवकाळी पावसाचा इशारा

0
26

🔥दैनिक सिंधुदुर्ग समाचार l मुंबई:-

महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. देशभरात पुढील तीन दिवस जोरदार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेकडील काही भागांमध्ये अंदमान समुद्राच्या दक्षिणेकडील भाग, निकोबार बेटे आणि अंदमान समुद्राच्या उत्तर भागातून नैर्ऋत्य मान्सून दाखल झाला आहे. अशातच बंगालच्या उपसागरात 23 मे ते 28 मे या दरम्यान प्रचंड वेगाने चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. संभाव्य चक्रीवादळाचे नाव शक्ती असे असेल. 16 ते 18 मे दरम्यान बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. https://sindhudurgsamachar.in/maharashtra-राज्याचा-दहावीचा-निकाल-94-1/

राज्यात नैर्ऋत्य मोसमी पावसाची हालचाल सुरू झाली आहे. दक्षिण बंगालच्या उपसागराच्या काही भागांमध्ये, दक्षिण अंदमान समुद्र, निकोबार बेट आणि उत्तर अंदमान समोरच्या काही भागांत नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरू आहे. यामुळे येत्या काही दिवसांमध्ये पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवली आहे. याच पार्श्वभूमीवर आज बुधवारी (ता. 14) राज्यातील काही भागांत मेघगर्जनेसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यात मेच्या सुरुवातीपासून ढगाळ वातावरणासह ठिकठिकाणी पाऊस पडतो आहे.

आज (बुधवारी) विदर्भातील बुलडाणा, चंद्रपूर व यवतमाळ जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. या जिल्ह्यांना हवामानशास्त्र विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे (घाट विभागासह), नाशिक (घाट विभागासह), कोल्हापूर (घाट विभागासह), सातारा (घाट विभागासह), सांगली, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, बीड, लातूर, धाराशिव, अमरावती, अकोला, नागपूर, वर्धा, वाशीम, गोंदिया, गडचिरोली आणि भंडारा जिल्ह्यांत विजांचा कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवली असल्यामुळे या जिल्ह्यांना ‘यलो अलर्ट’ दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here