Maharashtra: गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई; चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

0
39
गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई;,
गडचिरोलीत पोलिसांची मोठी कारवाई; चकमकीत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा

नारायणपूर : नलक्षग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात पोलिसांनी मोठी कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे. गडचिरोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या नारायणपूर जिल्ह्यात कालपासून सुरू असलेल्या नक्षल चकमकीत आठ नक्षली ठार झाले आहेत. या कारवाईत नक्षलवाद्यांकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. दंतेवाडा, नारायणपूर आणि बस्तर या तीन जिल्ह्यांच्या संयुक्त सुरक्षा दलामुळे हे यश मिळाले आहे.https://sindhudurgsamachar.in/maharashtra-पुण्यातील-हिट-अँड-रन-अपघ/

नारायणपूर अबुझमाडच्या सीमावर्ती भागातील रेकाव्याच्या जंगलात कालपासून सुरू असलेली पोलीस आणि नक्षलवाद्यांची चकमक संपली. या चकमकीत आतापर्यंत ८ नक्षलवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. या सर्वांचे मृतदेह सापडले असून चकमकीनंतर पोलीस व सैन्याचे जवान मृतदेह घेऊन मुख्यालयाकडे परतत आहेत. मुख्यालयात जाण्यासाठी सैनिक इंद्रावती नदी पार करतानाचे एका व्हिडिओत दिसत आहे.

या कारवाईत तीन जिल्ह्यांतील पोलीसही सहभागी झाले होते, हे संयुक्त ऑपरेशन होते. डीआरजी, बस्तर फायटर आणि एसटीएफच्या ८०० जवानांनी संपूर्ण परिसराला वेढा टाकला होता. नक्षलवाद्यांना पळून जाण्याचा मार्गही नव्हता. आयईडी पेरल्यानंतर ते घनदाट जंगलात लपून बसले होते, आणि छुप्या पद्धतीने गोळीबार करत होते, पण त्यांना त्यांच्या मनसुब्यात यश आले नाही.

नक्षलवाद्यांची संख्या आणि कारवाया पाहून जवान सतर्क होते, अखेर त्यांनी जंगलात लपून बसलेल्या नक्षलवाद्यांचा खात्मा केला आहे. दरम्यान, नारायणपूर चकमकीनंतर जवानांच्या परतीची प्रक्रिया सुरू झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here