Sindhudurg: महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने आंतरराष्ट्रीय वेबिनारमध्ये शोधनिबंध सादर !

1
148

मंदिरांत सादर केलेले संगीत व नृत्य आध्यात्मिक प्रगतीला चालना देते ! – संशोधनाचा निष्कर्ष

प्राचीन काळी मंदिरांमध्ये देवतांसमोर कलाकारांनी कला सादर केल्यावर भाविकांना भावाची अनुभूती येत असे आणि त्या त्या देवतांचे तत्त्व मोठ्या प्रमाणात तेथे आकर्षित होत असे. म्हणूनच भारतीय मंदिरे ही संपूर्ण समाजाच्या आध्यात्मिक प्रगतीची आणि कल्याणाची साधने होती. मंदिरांमध्ये सादर केलेले संगीत आणि नृत्य आध्यात्मिक प्रगतीला चालना देऊ शकते, असा संशोधनाद्वारे काढण्यात आलेला निष्कर्ष महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे श्री. शॉन क्लार्क यांनी मांडला. https://sindhudurgsamachar.in/vengurla-गणित-मुलभूत-कौशल्ये-प/

प्रसिद्ध इंडोलॉजिस्ट आणि नवी दिल्ली येथील भारतीय विद्या भवनच्या ‘के.एम. मुन्शी सेंटर’चे डीन डॉ. शशी बाला यांनी आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय ऑनलाइन कार्यक्रमात (वेबिनार) ते बोलत होते. ‘भारतीय शास्त्रीय संगीत आणि नृत्य यांच्या उत्पत्तीमध्ये भारतीय मंदिरांचे महत्त्व’ या विषयावर शोधनिबंध श्री. शॉन क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी ऑनलाइन सादर केला.  महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले हे या शोधनिबंधाचे लेखक आहेत, तर  श्री. शॉन क्लार्क हे सहलेखक आहेत.

श्री. शॉन क्लार्क पुढे म्हणाले की, एका चाचणीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत आणि नृत्य विभागातील साधकांनी एका प्राचीन शिवमंदिरात भारतीय शास्त्रीय नृत्य सादर केले. युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर (यु.ए.एस.) वापरून कलाकार, शिवलिंग आणि भगवान शिवाची प्रतिमा यांची प्रभावळ मोजण्यात आली. कार्यक्रम सादर केल्यानंतर या सर्वांतील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे आढळले. या वेळी देवतेचे तत्त्व जास्त प्रमाणात आकर्षित झाल्याने देवतेच्या प्रतिमेच्या प्रभावळीत सर्वांत जास्त वाढ झाल्याचे आढळले. दुसर्‍या एका चाचणीत महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संगीत आणि नृत्य विभागातील एका साधकाने श्री दुर्गादेवीचे मंदिर, एक सभागृह, आध्यात्मिक संशोधन केंद्राचा स्टुडिओ आणि आश्रम येथे एक भजन गायले. आश्रम आणि मंदिर येथील सादरीकरणाच्या वेळी गायकाच्या सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे आढळले, तर सभागृहातील सादरकरणाच्या वेळी सकारात्मक प्रभावळ अल्प झाल्याचे आढळले. याचे कारण असे की, मंदिर आणि आश्रम हे सकारात्मक ऊर्जेचे स्रोत आहेत आणि तेथे भजने गायल्याने सकारात्मकता वृद्धिंगत होते, तर प्रेक्षागृहे ही केवळ मनोरंजनासाठी वापरली जातात.

1 COMMENT

  1. […] पुणे : राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. प्रत्येक पक्षाच्या गोटात वेगवेगळ्या आणि जलद गतीने घडामोडी घडत आहेत. राज्यात सत्तांतर होऊन तीन महिने होऊन गेले आहेत. पण अद्याप मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार झालेला नाही. सत्ताधारी पक्षातील अनेक आमदारांना मंत्रिपदाची अपेक्षा आहे. या दरम्यान आमदार रवी राणा आणि आमदार बच्चू कडू यांच्यातील वाद टोकाला पोहोचला आहे. राज्य सरकारकडून आता त्यांच्यातील वाद मिटवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यासाठी मध्यस्थी केल्याच्या देखील बातम्या समोर आल्या आहेत. सत्ताधारी पक्षातील आमदारांमध्ये धुसफूस असल्याच्या देखील काही बातम्या समोर आल्या आहेत. सत्ताधारी पक्षामध्ये विविध घडामोडी सुरु असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आता लांबचा विचार करत आहे. त्यामुळे आगामी महापालिका, नरपालिका, नगरपरिषद, जिल्हा परिषद या सर्व निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शड्डू ठोकला आहे. आता आगामी निवडणुका जिंकून दाखवायच्याच असा निर्धार पक्षाच्या वरिष्ठांनी केलाय. त्यामुळे पक्षाच्या वरिष्ठ पातळीपासून ते सर्वसामान्य कार्यकर्त्यांपर्यंतच्या हालचालींना वेग आला आहे.http://sindhudurgsamachar.in/sindhudurg-महर्षि-अध्यात्म-विश्व… […]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here