कुडाळ ; मुसळधार पावसाने कोकणातील सर्व नद्यांच्या पाण्यात वाढ झाली आहे . कुडाळ एमआयडीसीत रेल्वे रुळ पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे रेल्वे तीन तास उशिराने धावणार आहेत अशी माहिती रेल्वे प्रशासनान आली आहे. त्यामुळे प्रवाश्यांचे हाल होत असल्याचे दिसून येत आहे https://sindhudurgsamachar.in/sindhudurg-गडनदी-तसेच-तेरेखोल-नदीच/
बांद्यात तेरेखोल नदीचे पाणी आळवाडा बाजारपेठेत घुसले ;नागरिकांची पळापळ
▪️इन्सुली कुडवटेंब येथे महामार्गावर पुराचे पाणी
होडावडा पुलावर पाणी आल्याने वाहतूक ठप्प
⭐तळवडा बाजारपेठेतही पाणी
वेंगुर्ले :-दोन दिवस सुरू असलेल्या मुसळधार पावसाने वेंगुर्ले सावंतवाडी या मार्गावरील होडावडा येथील मुख्य पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. तसेच या पाण्यामुळे होडावडा आणि तळवडा या गावाचा संपर्क तुटला आहे. तसेच तळवडा बाजारपेठेतही पाणी आले असून सर्वत्र जनजीवन विस्कळीत झाले आहे.
ओटवणे, विलवडे, सरमळे रस्ते पाण्याखाली ; ओटवणे नदीने गाठली धोक्याची पातळी