रत्नागिरी -राहुल वर्दे
सागरी महामार्गावरून जैतापूरहून देवगडच्या दिशेने जाणाऱ्या एका आयशर टेम्पोने बाकाळे येथील तीव्र अशा अवघड वळणावर तीन ते चार जणांना धडक दिली.ही घटना सागरी महामार्गावर मंगळवारी दुपारी घडली असुन यात दोन बालिकांचा अपघाती मृत्यू झाला आहे यामध्ये एका 12 वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला, तर पाच वर्षाच्या मुलीला उपचारासाठी नेत असताना तिचे निधन झाले. अन्य दोघांनाही या अपघातात गंभीर दुखापत झाले असल्याचे नाटे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.
टेम्पो सोडून टेंम्पो चालक पसार झाला. बाकाळे येथे रस्त्याच्या कामावर आलेल्या मजुरांपैकी ही लहान मुले असल्याचे स्थानिकांनी सांगितले. येथील प्रत्यक्षदर्शी व्यक्तींनी तत्काळ सागरी पोलिसांशी संपर्क साधल्यानेसहाय्यक पोलीस निरीक्षक आबासाहेब पाटील आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. जखमींना प्राथमिक आरोग्य केंद्र जैतापूर येथे हलविण्यात आले. या दरम्यान एका मुलीचा मृत्यू झाला. टेम्पो पोलिसांनी ताब्यात घेतला असून गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सायंकाळी उशिरा पर्यंत सुरू होती.