केंद्रीयमंत्री नारायण राणेंना रत्नागिरी पोलिसांकडून अटक

0
77

“मी असतो तर कानाखालीच…”; मुख्यमंत्र्यावर टीका करताना केंद्रीयमंत्री नारायण राणेंचं भर पत्रकारपरिषदेत खळबळजनक असं विधान करण्यात आल्याने, सर्वत्र जोरदार चर्चा सुरू मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी केलेल्या भाषणावर टीका करताना नारायण राणे यांनी हे विधान केलं आहे.केंद्रीयमंत्री राणेंची जन आशीर्वाद यात्रा पोहचली होती. यावेळी पत्रकारांशी बोलताना राणेंकडून असं खळबळजनक विधान करण्यात आलं होत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना कानाखाली लावण्याचं वक्तव्य केंद्रीय मंत्री नारायण राणेंना चांगलंच भोवलं आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे.रत्नागिरी कोर्टानं नारायण राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी अटकेची कारवाई केली आहे. रत्नागिरी पोलिसांनी आता राणेंचा ताबा महाड पोलिसांकडे सोपवला आहे. रत्नागिरी-रायगड सीमेवर ही प्रक्रिया करण्यात आली. नारायण राणे यांना महाड कोर्टात हजर करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहिती अशी की, नारायण राणे यांना महाड एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये आणण्यात येणार आहे. महाड एमआयडीसी पोलिस स्टेशनबाहेर मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. महाड येथील प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी यांच्यासमोर आजच नारायण राणे यांना हजर करण्यात येईल.


दरम्यान, रत्नागिरी पोलिसांनी नारायण राणे यांना ताब्यात घेतल्यानंतर संगमेश्वर पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आलं. राणे यांना नाशिक पोलिसांकडे सुपुर्द करण्यात येणार असल्याची माहिती देखील मिळाली होती. नारायण राणे यांना त्यांच्या गाडीतून पोलिस स्टेशनमध्ये नेण्यात आल्याची माहिती मिळाली आहे. केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्यासोबत भाजपचे नेते प्रसाद लाड हे आहेत. नारायण राणे यांनी त्यांच्याविरोधात दाखल झालेल्या सर्व गुन्ह्यांची माहिती देण्यात आली होती. कोणते कलम लावण्यात आले याची माहिती देण्यात आली.

नाशिक पोलिसांचं पथक देखील कोकणात दाखल झालं आहे. त्यामुळे सकाळपासूनच केंद्रीयमंत्री नारायण राणे यांच्या अटकेबाबत चर्चा सुरू होती. दुसरीकडे, शिवसेना आक्रमक झाली आहे. या यांच्या ‘त्या’ वक्तव्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटले आहे. मुंबईसह राज्यभरात आंदोलन करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here