केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवल्याने शरद पवारांनी व्यक्त केली तीव्र नाराजी

0
89
शरद पवार,दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल
लोकशाही वाचवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांनी पाठिंबा देण्याचे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केले आवाहन

देशात कोरोना संसर्गाचा फटका सगळ्यांनाच बसला आहे.देशातील प्रत्येक कुटुंबामध्ये आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत.त्यातच केंद्रसरकारने खतांच्या किंमती  वाढवून शेतकऱ्यांसमोर नवीन संकट उभे केले आहे. शेतकऱ्यांसमोर आधीच संकट आहे, या काळात खतांच्या किंमतींमध्ये वाढ करणे योग्य नाही. ही दरवाढ मागे घ्यावी अशी मागणी शरद पवारांनी केली आहे. या निर्णयाचा तातडीने पुनर्विचार व्हावा अशीही मागणी त्यांनी केली आहे.

शरद पवारांनी लिहिले की, देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट सुरू आहे. या लाटेचा सर्वांनाच तडाखा बसला आहे. शेतकऱ्यांसाठी ही परिस्थिती भीषण आहे. असे असताना शेतकऱ्याच्या समस्यांकडे सरकारने प्राधान्याने लक्ष द्यायला हवे. मात्र असे असताना या उलट काम केंद्राकडून केले जात आहे. बळीराजाला मदतीचा हात देण्याऐवजी केंद्र सरकारने खतांच्या किंमती वाढवण्याचा निर्णय घेऊन शेतकऱ्यांच्या समस्यांत भर घालण्याचे काम केले असल्याचे म्हणत शरद पवारांनी नाराजी व्यक्त केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here