चिपळूण पूर:पाटबंधारे खात्याचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर

0
86

चिपळूण: प्रतिनिधी राहुल वर्दे

अतिवृष्टीमुळे चिपळूण,खेड शहरात म्हपुराने थैमान घातले,पाटबंधारे खात्याचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर करण्यात आला आहे. कोळकेवाडी येथून पाणी सोडल्याने हा महापुर आलेला आहे अस म्हणता येणार नाही.जगबुडीचे पाणी वाशिष्ठीला मिळाल्यानं फुगवटा निर्माण झाल्याचा देखील उल्लेख करण्यात आला आहे. कोयना प्रकल्पाचे माजी मुख्य अभियंता व धरण सुरक्षा पुनर्स्थापना समितीचि अध्यक्ष दीपक मोडक यांनी हा अहवाल दिला आहे चेपळूण शहराला पुराचा फटका बसला. या सगळ्या म्हपुराची चौकशी करण्याची मागणी करण्यात येत आहे. पण, यापुराला मुसळधार झालेला पाऊस जबाबदार असल्याचं पाटबंधारे खात्याच्या प्राथमिक अहवालात म्हटलं आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल शासनाला सादर देखील करण्यात आला आहे. मुख्य बाब म्हणजे जगबुडीचे पाणी वाशिष्ठीला मिळाल्यानं फुगवटा निर्माण झाल्याचा उल्लेख देखील यामध्ये करण्यात आलेला आहे. तर, कोळकेवाडी धरणातून ८ हजार ४०० क्यूसेक्स पाणी सोडण्यात आल्याचं देखील या अहवालामध्ये म्हटलं आहे. मुख्य बाब म्हणजे चिपळूणला आलेल्या पुराची कारणमीमांसा करत त्याकरता उपाय देखील या अहवालामध्ये सुचवण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here