बाहेरील राज्यातून येणाऱ्या लोकांमुळे संक्रमणाची भीती -बाळा नांदगावकर

0
85
मनसे-नेते-बाळा-नांदगावकर

देशातील पाच राज्यांमध्ये सध्या विधानसभा निवडणुका सुरू आहे. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रचार सभा घेतल्या जात आहे. यामध्ये प्रचंड गर्दी होत आहे. कोरोनाच्या कोणत्याही नियमांचे पालन या ठिकाणी होत असल्याचे दिसत नाही. ‘राज्य सरकारने बंगाल, तामिळनाडू, केरळ येथून येणाऱ्या नागरिकांवर त्वरित कडक निर्बंध लावणे गरजेचे आहे. कारण तिथे निवडणुकी दरम्यान सगळे नियम झुगारल्याने येणारे नागरिक हे सुपर स्प्रेडर ठरू शकता. याबाबत वेळीच नियोजन करणे अतिशय गरजेचे आहे.’ असे मनसे नेते बाळा नांदगावकर म्हणाले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here