आदिवासींच्या हक्कांसाठी संघर्ष करणाऱ्या स्टॅन यांचे निधन सोमवारी निधन झाले. निधन 84 मवारी निधन झाले. फादर स्टॅन स्वामीनी झारखंडमध्ये सुमारे पाच दशके काम केले होते. विस्थापन, भूसंपादन यासारख्या मुद्द्यांवर त्यांनी लढा दिला.नक्षलवाद्यांच्या नावाखाली 3000 लोकांना तुरूंगात पाठवण्यात आले असा दावा त्यांनी केला आहे.
31 डिसेंबर 2017 रोजी पुण्याजवळील भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराच्या आरोपाखाली त्याला अटक करण्यात आली होती. या हिंसाचारात एका व्यक्तीचा मृत्यू झाला होता. या हिंसाचारापूर्वी एल्गार परिषदेची बैठक झाली होती, असे एनआयएने म्हटले होते. स्टॅन यांना मुंबईच्या तळोदा तुरुंगात पाठवण्यात आले होते. येथे त्यांनी खराब आरोग्य सविधा असल्याची तक्रार केली होती. तुरूंगात आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याचे सांगितले होते. तुरूंगात आरोग्य सुविधा, चाचण्या, स्वच्छता आणि सोशल डिस्टंसिंग यासारख्या गोष्टींकडे दुर्लक्ष आहे असेही त्यांनी सांगितले होते.
फादर स्टॅन स्वामी यांची तब्येत जास्त बिघडल्यानंतर 28 मे रोजी मुंबई उच्च न्यायालयाने त्यांना रुग्णालयात पाठवण्याचे आदेश दिले होते. होळी फॅमिली रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. एनआयएने स्टॅन स्वामी यांना दिलेल्या जामिनास विरोध केला होता. त्याच्या तब्येतीचा ठोस पुरावा नसल्याचे, एनआयएने स्टॅन स्वामी यांना दिलेल्या जामिनास विरोध केला होता. त्याच्या तब्येतीचा ठोस पुरावा नसल्याचे तपास यंत्रणेने म्हटले होते. ते माओवादी आहेत आणि त्यांनी देशात अस्थिरता आणण्याचे षडयंत्र रचले आहे असे तपास यंत्रणेने म्हटले होते.