राज्याच्या काही जिल्ह्यात १६ ते १८ ऑक्टोबरपासून मेघ गर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. गेले काही दिवस परतीच्या पावसाने अनेक राज्यात धुमाकूळ घातला असून कोकणसह, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातही काही ठिकाणी तुरळक तर काही ठिकाणी जोरदार पाऊस सुरु आहे.
शनिवारी नागपूरसह अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या १४ जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला असून या जिल्ह्यांमध्ये शनिवारी विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली.या पावसामुळे शेतकऱ्याचे लाखोंचे नुसकान होत आहे.