इंद्रायणीला पूर; आषाढी वारीसाठी आळंदीत येऊ नका – प्रशासनाचे वारकरी व भाविकांना आवाहन

0
14
इंद्रायणीला पूर; आषाढी वारीसाठी आळंदीत येऊ नका – प्रशासनाचे वारकरी व भाविकांना आवाहन
इंद्रायणीला पूर; आषाढी वारीसाठी आळंदीत येऊ नका – प्रशासनाचे वारकरी व भाविकांना आवाहन

इंद्रायणीला पूर; आषाढी वारीसाठी आळंदीत येऊ नका – प्रशासनाचे वारकरी व भाविकांना आवाहन

नदीवरील चारही पूल पाण्याखाली; सुरक्षित ठिकाणीच थांबण्याचे निर्देश

आळंदी, दि. ७ जुलै :
आषाढी वारी २०२६ निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने वारकरी, भाविक आणि नागरिकांसाठी महत्त्वाचे आवाहन केले आहे. मुसळधार पावसामुळे इंद्रायणी नदीला मोठा पूर आला असून, आळंदी शहरात प्रवेश करणारे नदीवरील चारही पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे सध्या आळंदी शहरात येणे सुरक्षित नसल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
आळंदीकडे प्रवास सुरू केलेल्या वारकरी आणि भाविकांनी ज्या ठिकाणी आहेत तेथेच सुरक्षित थांबावे आणि आळंदीत येण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
तसेच नागरिकांनी प्रशासन, पोलीस यंत्रणा आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून वेळोवेळी दिल्या जाणाऱ्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. अफवांवर विश्वास ठेवू नये तसेच नदीपात्र, घाट परिसर आणि बंद करण्यात आलेल्या पुलांकडे जाणे टाळावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून, सर्वांनी संयम राखून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here