गणपतीच्या विसर्जनासाठी यावेळी पावसाने हजेरी लावली.गेले चार-पाच दिवस राज्यात सगळीकडंच पावसाने जोर धरला आहे. हवामान विभागाने पुढील पाच दिवस पावसाचा जोर आणखीन वाढणार असल्याचे सांगितले आहे .तर काही भागात विजेच्या कडकडाटासह पाऊस पडणार असल्याचेही सांगितले आहे. कोकण, विदर्भ,पश्चिम महाराष्ट्रात हवामान विभागाने येल्लो अलर्ट जारी केला आहे
पावसाच्या आगमनाने बळीराजा मात्र सुखावला आहे.गेल्या १५ दिवसांपासून पावसाने ओढ दिली होती त्यामुळे शेतकरी वर्गात पिकांची काळजी वादळी होती. या पावसाच्या आगमनाने बळीराजा आनंदला आहे.n


