जिल्हा परिषद–पंचायत समिती निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्याची मागणी
आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, या मागणीसंदर्भात आज राज्य निवडणूक आयुक्त तसेच राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांना निवेदन सादर करण्यात आले.
लोकशाही प्रक्रियेतील पारदर्शकता आणि मतदारांचा विश्वास अधिक दृढ करण्याच्या दृष्टीने बॅलेट पेपर प्रणाली अधिक योग्य असल्याचे मत निवेदनात व्यक्त करण्यात आले आहे. या विषयावर राज्य शासनाने आणि निवडणूक आयोगाने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.


