‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींकडून कोकणाच्या समृद्ध वारशाचा उल्लेख

0
15
‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींकडून कोकणाच्या समृद्ध वारशाचा उल्लेख
‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींकडून कोकणाच्या समृद्ध वारशाचा उल्लेख

‘मन की बात’मध्ये पंतप्रधान मोदींकडून कोकणाच्या समृद्ध वारशाचा उल्लेख

नवी दिल्ली, दि. १ जून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या ‘मन की बात’ कार्यक्रमातून भारताच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, स्थानिक उत्पादने आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी त्यांनी कोकण आणि गोव्याची प्रसिद्ध सोलकढी, कोकम सरबत तसेच महाराष्ट्रातील जगप्रसिद्ध हापूस आंब्याचा विशेष उल्लेख केला.

उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर आरोग्यदायी आणि पारंपरिक पेयांचे महत्त्व सांगताना पंतप्रधानांनी सोलकढी आणि कोकम सरबत यांसारख्या नैसर्गिक पेयांची प्रशंसा केली. या पेयांमुळे शरीराला थंडावा मिळतो तसेच आरोग्यालाही लाभ होतो, असे त्यांनी नमूद केले.
याशिवाय कोकणातील हापूस आंब्याचा गावातील शेतकऱ्यांपासून ते जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचलेला प्रेरणादायी प्रवासही त्यांनी अधोरेखित केला. स्थानिक उत्पादनांना जागतिक ओळख मिळवून देण्यासाठी शेतकरी, उद्योजक आणि विविध संस्थांनी केलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले.
पंतप्रधानांच्या या उल्लेखामुळे कोकणातील पारंपरिक खाद्यसंस्कृती, स्थानिक उत्पादने आणि हापूस आंबा पुन्हा एकदा राष्ट्रीय स्तरावर चर्चेत आले असून कोकणवासीयांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here