रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचा जीव वाचला; संदीप नाईक यांना रोख पुरस्कार

0
7
रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचा जीव वाचला; संदीप नाईक यांना रोख पुरस्कार
रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचा जीव वाचला; संदीप नाईक यांना रोख पुरस्कार

रेल्वे कर्मचाऱ्याच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशाचा जीव वाचला; संदीप नाईक यांना रोख पुरस्कार

मंगळूर, दि. १२ :
सुरतकल रेल्वे स्थानकावरील पॉइंट्समन श्री. संदीप नाईक यांच्या प्रसंगावधानामुळे आणि तत्पर कृतीमुळे एका प्रवाशाचा जीव वाचल्याची घटना समोर आली आहे. त्यांच्या धाडसी कृतीमुळे संभाव्य मोठी दुर्घटना टळली.
माहितीनुसार, ट्रेन क्रमांक १०१०७ मडगाव–मंगळूर एक्सप्रेस सुरतकल स्थानकावरून सुटल्यानंतर एक प्रवासी धावत्या रेल्वेत चढण्याचा प्रयत्न करीत होता. यावेळी तोल जाऊन अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पॉइंट्समन श्री. संदीप नाईक यांनी तत्काळ धाव घेत प्रसंगावधान राखत संबंधित प्रवाशाला सुरक्षितपणे वाचवले.
त्यांच्या या धाडसी आणि कर्तव्यदक्ष कृतीमुळे एक मोठी दुर्घटना टळली असून रेल्वे प्रशासनाने त्यांच्या कार्याचे कौतुक केले आहे.
श्री. नाईक यांच्या अनुकरणीय शौर्याची आणि तत्पर सेवेची दखल घेत कोकण रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक (CMD/KRCL) यांच्या वतीने त्यांना ₹१०,००० चे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले.
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना धावत्या रेल्वेत चढण्याचा किंवा उतरण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन केले असून अशा प्रकारच्या निष्काळजीपणामुळे गंभीर अपघात होऊ शकतात, असा इशाराही दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here