येत्या तीन-चार दिवसांमध्ये पुन्हा एकदा पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.गुरूवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याची शक्यता हवामान खात्याने दिला आहे. पश्चिम महाराष्ट्र,मराठवाडा, आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचा अंदाज आहे.काही ठिकाणी मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता देखील वर्तवण्यात आली आहे. तर काही ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळले असा अंदाज आहे.
पेरणी झाल्यानंतर पिकाला हवा तास पाऊस न पडल्यामुळे शेतकरी चिंतेत पडला होता. पिकांना पावसाची गरज होती त्यामुळे पावसाने हजेरी लावल्यामुळे शेतकरी आनंदात आहे. खरिपाच्या पिकांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरत आहे. यामुळे शेतकरी सुखावला आहे


