शेतकऱ्यांना कर्जाच्या बोजातून मुक्त करण्यास प्राधान्य
मुंबई : सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे गोदावरी उपसा सिंचन सहकारी संस्था, बारगाव पिंपरी, ता. सिन्नर येथील थकीत कर्जमाफीबाबत आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी संस्थेच्या कर्जप्रश्नावर सविस्तर चर्चा करून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला.
“शेतकऱ्यांना कर्जाच्या बोजातून मुक्त करून त्यांच्या शेतीला पुन्हा आर्थिक बळ देणे, हेच आमचे प्राधान्य आहे,” असे मुख्यमंत्री सुमित्रा पवार यांनी यावेळी सांगितले.
थकीत कर्जामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य मिळावे आणि शेतीची उत्पादकता पुन्हा वाढावी, यासाठी शासनस्तरावर आवश्यक कार्यवाही करण्यावर बैठकीत भर देण्यात आला.