Sindhudurrg: ४३ कोटींची सिंधुदुर्गातील पहिली मालवण नळपाणी योजना मंजूर करून घेतली हे शिवसेनेचे यश- मंदार केणी

0
67
दैनिक सिंधुदुर्ग समाचार: मालवण नळपाणी योजना
       मालवण शहरासाठी ३० वर्षा पूर्वीच्या धामापूर नळयोजने द्वारे पाणी पुरवठा होत होता. मालवण नगरपरिषदेत सत्तांतर होऊन शिवसेनेची सत्ता आल्यानंतर आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून ४३ कोटींची नळयोजना मंजूर झाली.अनेक शासकीय प्रक्रिया पूर्ण करून निविदा प्रक्रिया सुरु असलेली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ही पहिली नळयोज़ना आहे. जिल्ह्यातील इतर नगरपालिकांच्या नळ योजनेची सुरवातच झालेली नाही.  मात्र मालवण नगरपरिषदेच्या नळयोजनेची निविदा प्रक्रिया सुरु झाली  हे  शिवसेनेचे यश आहे. आणि हि निविदा पारदर्शक स्वरूपाची आहे. त्यामुळे गणेश कुशे यांनी माझ्यावर व आमदार वैभव नाईक यांच्यावर टीका करण्याअगोदर  मालवण शहरासाठी आपले काय योगदान आहे याचा आधी विचार करावा असा सल्ला माजी बांधकाम सभापती मंदार केणी यांनी दिला आहे. 

        नळयोजनेबाबत माहिती देताना  मंदार केणी  म्हणाले, मालवण नळ पाणी योजनेचे 28 कोटीचे टेंडर एम जी पी कडे चार वेळा रिटेंडर झाले ती निविदा 70 टक्के जागा दराची निविदा आल्याने ते टेंडर रद्द करून ही योजना नगर परिषदेकडे हस्तांतर करण्यात आली त्यामुळे नगर परिषदेकडे नव्याने केलेल्या डी पी आर मध्ये ही योजना 53 कोटीची झाली नंतर ज्यावेळी ही योजना टेक्निकल मंजुरी करिता एमजीपी ऑफिस ठाणे यांच्या जवळ गेली त्या ठिकाणी बरीचशी नळ पाणी योजनेची लाईन ही डोंगरातून येत असल्याने एम एस पाईप ऐवजी डी आय पाईप पकडल्यास सोयीस्कर होईल म्हणून त्या ठिकाणी डी आय पाईप पकडण्यात आले त्यामध्ये एम एस पाईप डीआय पाईप यातील दराची तफावत यामुळे त्या ठिकाणी पाच कोटी रुपये हे कमी झाले
    
        तसेच धामापूर तलावातील  विहीर तलावात पकडण्यात आली होती त्या ठिकाणी वेटलँड डिक्लेअर करत असल्याने त्या ठिकाणची विहीर रद्द करण्यात आली त्यामध्ये किमान तीन कोटी हे कमी झाले त्यामुळे या योजनेतील जवळजवळ दहा कोटीचा फरक कमी झाल्याने ही योजना 43 कोटीची  झाली.  त्यामुळे जेवढा विलंब योजना होण्यास किंवा टेंडर होण्यास त्या ठिकाणी होतो त्यावेळी डीएसआर प्रमाणे त्या योजनेतील पाईपचे दर असतील किंवा इतर गोष्टींचे डीएसआर हे बदलत असतात मग त्या डीएसआर प्रमाणे योजनेपूर्वी किंवा टेंडर झाल्यानंतर ते इस्टिमेट रिवाईज केले जाते  त्यामुळे योजनेचे निविदेची रकमेमध्येही फरक होत असतो. 
     
        मालवण शहराच्या महत्त्वाच्या नव्याने होणाऱ्या नळपाणी योजनेशी  गणेश कुशे यांना कोणतेही सोयरसुतक नाही ज्यांना काही योजनांशी  देणं घेणं नसतं परंतु  सभागृहात कॉन्ट्रॅक्टर हरिस्मेंट  कसं करावं स्टॅंडिंग मध्ये आलेल्या टेंडर ना आपल्या आर्थिक गणितांसाठी अडवण्याचे काम गणेश कुशे यांनी गेली पाच वर्ष केले त्यांना  कंटाळून काही कर्मचाऱ्यांनीही नगरपालिकेतून रिटायरमेंट घेण्याचे  ठरवले. अशा पद्धतीने कर्मचाऱ्यांचीही हॅरिसमेंट  गणेश कुशे त्यांच्या चमूने केली.   
      
        डीपी आर बनवला नाही तर योजना कुठून होणार त्यामुळे गणेश कुशे हे लोकांना भरकटवण्याचे काम करत आहेत आमचा विरोध डीपी आर ला होता पण नळपाणी योजनेला नव्हता असं सांगून वेळ मारून नेण्याचे काम गणेश कुशे  करत आहेत. आराखडा बनविणाऱ्या माची या व्यक्तींची मागील बिलाच्या वेळी आर्थिक गणितासाठी धमकी देऊन पाठ पकडल्यानेच गणेश कुशे आणि त्यांच्या कपू च्या भीतीनेच माची हे नगर परिषदेमध्ये येण्यास घाबरत होते. माचींची सेटलमेंट न झाल्यानेच डीपीआर रद्द करण्याचा गणेश कुशींचे षडयंत्र होते आणि विरोधी ठरावाने ते उघडे पडले जिल्हाधिकाऱ्यांकडे  या ठरावाच्या विरोधात मांडलेली उपसूचना घेऊन जाण्याचा प्रयत्न गणेश कुशेनी केला असेल पण त्यांचा उद्देश हा वरिष्ठांना खुश करण्यासाठी त्यांच्या आदेशाचे पालन करण्यासाठी आणि कॉन्ट्रॅक्टरला त्रास देण्याचा होता योजना होण्यासाठी हेतू असता तर त्यांना त्या  ठिकाणी इस्टिमेट मधील त्रुटी काढण्याचे  काम सुद्धा करता आले असते. त्यामुळे फायर स्टेशन, मच्छी मार्केट ही काम चालू आहेत मालवण नगरपालिकेत  आमदार वैभव नाईक यांच्या प्रयत्नातून मालवण शहरासाठी अग्निशामक बंब आला आहे त्यामुळे स्वतःची आर्थिक गणित न जुळल्यास ती काम कशा पद्धतीने बंद पाडायची  याचे  उदाहरण म्हणजे मालवण शहरातील स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आहे.  गणेश कुशे यांच्या याच वृत्तीमुळे त्यांना नगरपालिकेमध्ये कोणीही कर्मचारी विचारत नाही आणि प्रभागातही लोक आता त्यांची उचल बांगडी  करण्याच्या विचारात आहेत. त्यामुळे ज्या नगरसेवकांना कर्मचारी महत्व देतात मानसन्मान देतात हे  शहरातील  विकास कामांसाठी त्यांच्या असलेल्या तळमळीमुळेच. परंतु स्वतःच्या स्वार्थासाठी आणि आर्थिक गणितांसाठी जे नगरपालिकेत वावरत होते त्यांचा कार्यकाल संपल्यानंतर नगरपरिषदेत कोणीही कर्मचारी किंवा अधिकारी त्यांना  विचारत नाहीत हे सत्य नाकारू शकत नाही.
          
         गणेश कुशे यांनी स्वतःच्या प्रभागातील जनतेशी आमने-सामने करा आणि नंतरच आमच्याशी आमने सामने करण्याची भाषा करा त्यामुळे गणेश कुशे यांनी चिवला बीज येथील हॉटेल मालकाबरोबर कशा पद्धतीने मलिदा खाऊन त्या ठिकाणच्या सार्वजनिक टॉयलेट तोडण्याचा ठराव स्टॅंडिंगमध्ये करून कशा पद्धतीने नगरपरिषदेच्या ताब्यात असलेली सार्वजनिक मालमत्ता ही स्वतःच्या पदाचा गैरवापर करून त्या हॉटेल मालकाच्या ताब्यात दिली याचे पुरावे लवकरच आम्ही जनतेला  देऊ त्या ठिकाणी पर्यटकांना सोयी सुविधा करिता टॉयलेट किंवा बाथरूम होऊ शकले असते त्यामुळे स्वतःच्या स्वार्थासाठी गणेश कुशे हे कुठच्या थराला जाऊ शकतात याचे  उदाहरण ही सार्वजनिक जागा आहे त्यामुळे गणेश कुशे हे सभ्यतेच कातड पांघरून वरिष्ठांना फसवत आहेत अशी टीका मंदार केणी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here