आंतरराष्ट्रीय पत्रलेखन स्पर्धेचे आयोजन
१५ वर्षांखालील विद्यार्थ्यांसाठी भारतीय टपाल विभागाची संधी
भारतीय टपाल विभागतर्फे आंतरराष्ट्रीय स्तरावरील पत्र लेखन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.या स्पधेचे विषय तुमच्या मित्राला / मैत्रिणीला डिजिटल जगात मानवी संबंध का महत्वाचा आहेत याबद्दल पत्र लिहा.ज्या मुलांचे वय 5 मे 2026 रोजी 15 वर्षे पेक्षा जास्त नाही अशी मुले स्पर्धेमध्ये भाग घेऊ शकतात.पत्र लेखन मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतच करावे.
लिहण्यात येणारा संदेश पत्राच्या स्वरुपात असावा व शब्द संख्या 800 पेक्षा जास्त नसावी. अर्जावरील वय शाळेच्या अधिका-यांनी प्रमाणित केलेले असावे.
अर्ज पाठविण्याची अंतिम तारीख 25 फेब्रुवारी 2026 आहे.
विद्यार्थ्यांना डिजिटल माध्यमांच्या पलीकडे जाऊन भावनिक संवाद, मैत्री, आपुलकी आणि माणुसकीचे मूल्य समजून घेण्याची संधी मिळणार आहे. जागतिक स्तरावर विद्यार्थ्यांला विचार मांडण्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे.


