विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालेल्या प्रत्येक वारकऱ्याचा प्रवास सुखकर, सुरक्षित आणि आनंददायी व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (एसटी) प्रत्येक फेरी सेवाभावाने अविरत सुरू आहे.
वारकऱ्यांच्या श्रद्धेचा मान राखत, त्यांच्या सेवेसाठी प्रत्येक बस ही केवळ प्रवासाचे साधन नसून भक्ती, समर्पण आणि सेवाभावाची अखंड वारी ठरत आहे.