भारतीय महिला क्रिकेट संघाची लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी अधिकृत पात्रता
भारतीय महिला क्रिकेट संघाची लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकसाठी अधिकृत पात्रता
ऐतिहासिक क्षण
नवी दिल्ली, दि. १ : भारतीय महिला क्रिकेट संघाने लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिक स्पर्धेसाठी अधिकृतपणे पात्रता मिळवून इतिहास रचला आहे. शतकाहून अधिक काळानंतर क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्ये समावेश होत असल्याने हा भारतीय क्रिकेटसाठी आणि जागतिक क्रीडाविश्वासाठी एक ऐतिहासिक टप्पा मानला जात आहे.
क्रिकेटच्या ऑलिम्पिकमधील पुनरागमनामुळे भारतीय महिला संघाला जागतिक क्रीडा मंचावर सुवर्ण कामगिरीची नवी संधी मिळणार आहे. या स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत इतिहास घडवावा, नव्या पिढीला प्रेरणा द्यावी आणि भारतासाठी ऑलिम्पिक पदक जिंकावे, अशा शुभेच्छा देशभरातून संघाला दिल्या जात आहेत.
टीम इंडिया, लॉस एंजेलिस २०२८ ऑलिम्पिकमधील यशस्वी वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!