
रत्नागिरीत ५८.३१ टक्के मतदानाची नोंद
रत्नागिरी │प्रतिनिधी
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत रत्नागिरी जिल्ह्यात ५८.३१ टक्के मतदानाची नोंद झाली आहे. सकाळपासूनच मतदारांनी उत्साहाने मतदान केंद्रांवर हजेरी लावली. महिलांपासून युवा मतदारांपर्यंत सर्वांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवत लोकशाही प्रक्रियेला बळ दिले.
हे पण वाचा रत्नागिरीच्या विकासातील खोळींबाबत जाधवांचा सत्ताधाऱ्यांवर निशाणा
दुपारनंतर काही केंद्रांवर रांगा वाढलेल्या दिसल्या, तर ग्रामीण भागातूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला. प्रशासनाकडून शांततेत आणि सुरळीत मतदान पार पाडण्यासाठी योग्य ती व्यवस्था करण्यात आली होती.
मतदानाचा अंतिम टक्का ५८.३१ वर स्थिरावल्यानंतर आता सर्वांचे लक्ष २१ डिसेंबरला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे.

